Sunday, 1 March 2015

माणसाचं लहरी मन

माणसाचं लहरी मन आणि पाऊस यांची किती छान सांगड घालता येईल. कधी खूप बरसतं दुसऱ्याला खूप सुख देतं. पावसाचही तसंच असतं तापलेल्या धरतीला शांत करून जातो. दोन माणसांची मनं तेंव्हाच एकत्र येऊ शकतात जेंव्हा ती एकमेकांत गुंतलेली असतात अगदी उसाच्या गुऱ्हाळाच्या दोन काटेरी चाकांसारखी जेंव्हा ती गुंततात तेंव्हाच ती एकमेकांच्या साथीनं पुढे जातात.
माणसाच्या मनानं  आभळासारखं असावं सर्वांची दु:ख्खे भरून घ्यावीत अन मन भरून आलं म्हणजे मग पावसासारखं पडून मोकळं  व्हावं. धुळीनं माखलेलं  पान जसं पाऊस पडून गेल्यावर हिरवं कंच होतं अगदी तसंच किंवा नव्या वहीच्या पहिल्या कोऱ्या पानासारखं मनानं नवं व्हावं अन पुन्हा एकदा सर्वांची दु:खं समावण्यासाठी तयार व्हावं.

2 comments:

  1. Pavsachi n lahari manachi sangad tar ghalta yeilch.
    Pan jar hya pavsala aple ashru awarta ale nahit, kiwa tyane aple dukkh samaun na gheta chukichya weli ashrunchi nadi keli tar...
    Dukkh tuze ni maze bhase samantar
    Hoil kautuk jar ghei samaun
    Watel nako jar deil akali tras...

    ReplyDelete
    Replies
    1. Agadi barobar aahe tuza. Manacha pan tasach aahe na samjutdar asel tar thik nahitar trasach hoto. :)

      Delete